राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
खरीप 2020 मधील या जिल्ह्यातील पीकविमा यादी आली.
खरीप 2020 मधील या जिल्ह्यातील पीकविमा यादी आली.
Read More
पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
Read More
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, MahaDBT अनुदान वितरण सुरू..पहा कोनते शेतकरी
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, MahaDBT अनुदान वितरण सुरू..पहा कोनते शेतकरी
Read More

धाराशिवमधील पिकविम्याचे २२० कोटी रुपये अखेर मिळणार!

२०२० च्या खरीप विम्याचा मार्ग सुकर

सन २०२० मधील खरीप हंगामातील पीक विम्याच्या भरपाईसाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढाईला अखेर यश आले आहे. प्रलंबित पीक विमा भरपाई वाटपाचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने पीक विमा कंपनीच्या विरोधात निकाल दिला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० च्या पीक विमा भरपाईपोटी आणखी २२० कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ADS किंमत पहा ×

अतिवृष्टीनंतर विमा कंपनीची टाळाटाळ

सन २०२० मधील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे काढणी पश्चात मोठे नुकसान झाले होते. मात्र, बजाज अलायन्स या खासगी पीक विमा कंपनीने न पटणारी तांत्रिक कारणे देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. याविरोधात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपल्या हक्कासाठी लढा दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापूर्वी खरीप हंगाम २०२० मधील नुकसानीपोटी विमा कंपनीच्या माध्यमातून २८९ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जवळपास २२० कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असतानाही विमा कंपनीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात होती.

Leave a Comment